1 Aug 2019

मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी

आज श्रावण शुद्ध प्रतिपदा, अनुत्तरभट्टारिका महारासेश्वरी श्रीकृष्णप्रेमस्वरूपा भगवती श्री मीराबाईंची जयंती.
श्री मीराबाई ह्या अलौकिक आणि अद्भुत विभूतिमत्व आहेत. त्यांच्या भक्तिविश्वाची व प्रगल्भ प्रेमभावाची किंचितशी कल्पनाही करणे, आपल्या मानवी बुद्धीच्या कक्षेच्या फार बाहेरचेच आहे. त्यांचे विलक्षण जीवनचरित्र, त्यांचे जगावेगळे बालपण, कर्तव्यपालन म्हणून नि:संगपणे त्यांनी केलेला संसार, कृष्णस्मरणात त्यांनी नि:संकोचपणे प्राशन केलेले विष व त्या विषाचा हरिकृपेने तत्काळ नष्ट झालेला प्रभाव, त्यानंतर सर्वसंग त्याग करून संपूर्ण भारतभर त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेला भक्तिप्रचार आणि त्यांचा अद्वितीय देहत्याग ; सारेच कल्पनातीत आहे ! चमत्कारालाही विस्मय वाटावा असेच आहे.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना एकदा एकाने प्रश्न विचारला, "मामा, श्रीसंत मीराबाईंना पण विष पाजले होते व सॉक्रेटिसलाही विषच पाजले गेले. मग दोघांत फरक काय?" प.पू.मामांनी दिलेले उत्तर अतिशय मार्मिक व पुरेसे बोलके आहे. ते म्हणाले, "अरे, विष पिऊन सॉक्रेटिस मेला, पण मीराबाई जिवंतच राहिल्या !" या एकाच वाक्यात प.पू.मामांनी श्रीसंत मीराबाईंचा अद्भुत अधिकार नेमकेपणाने अधोरेखित केला आहे.
.....यापुढील लेखातील श्रीसंत मीराबाईंच्या जीवनचरित्रावरील अल्पसे चिंतन आणि त्यांच्या अभंगसंपदेवरील तीन अद्भुत ग्रंथांचे रसग्रहण वाचण्यासाठी खालील लिंकवरील लेख अवश्य वाचावा ही विनंती.
मीराँ गिरधर प्रेम दिवाँणी
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_12.html?m=1

0 comments:

Post a Comment