18 Apr 2018

अक्षयतृतीयेचा अमृतयोग

नमस्कार मंडळी  !!
आज वैशाख शुद्‍ध तृतीया, अक्षय तृतीया  !!
भारतीय संस्कृतीनुसार हा साडेतीन सुमुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. आजच्या दिवशी केलेली कोणतीही चांगली गोष्ट अक्षय फल देणारी ठरते म्हणून ही अक्षयतृतीया. मुहूर्त अर्धा असला तरी फल मात्र पूर्णच मिळते बरं का !
या दिवशी दानाचे महत्त्व मानले जाते. दान हा भारतीय संस्कृतीचा व ऋषिप्रणित दिव्य जीवनशैलीचा महत्त्वाचा गुणविशेष आहे. दान हे एकप्रकारे धान्यासारखेच असते. एक बी पेरली की शेकडो बिया त्यातून परत मिळतात. हीच भावभूमिका दानामागे आहे; फक्त ती निरपेक्ष असावी, असे संत सांगतात. " देण्यातला " आनंद हा नेहमीच चक्रवाढ पद्धतीने वाढणारा असतो, तो अक्षयच असतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला दान शब्द लावला जातो, हे लक्षात घ्यावे. अन्नदान, ज्ञानदान, जलदान, न्यायदान.....सर्वच दाने आहेत. कारण त्यातून होणारा शाश्वत लाभ ऋषींच्या चित्रदर्शी दूरदृष्टीने आधीच जोखलेला आहे. आपणही आजच्या या पावन मुहूर्ताचे औचित्य साधून आपल्यापाशी जे काही आहे त्याचे समाधान मानत, त्यातूनच दान देण्याची वृत्ती सतत कशी वाढेल याचा पाठपुरावा करू या आणि अक्षय समाधानाचे धनी होऊ या !
अक्षयतृतीयेचे महत्त्व आणि माहात्म्य कथन करणारा गेल्या वर्षीचा लेख खालील लिंकवर आहे, तोही आवर्जून वाचावा ही विनंती !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
अक्षयतृतीयेचा अमृतयोग
http://rohanupalekar.blogspot.com/2017/04/blog-post_29.html

0 comments:

Post a Comment